औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना औरंगाबाद ते चाळीसगाव रेल्वे व्हावी, असे निवेदन देणार होते. परंतु, रावसाहेब दानवे यांनी त्यांचे निवेदन घेण्यास नकार दिला आहे. यामुळे भाजप नेते रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
हर्षवर्धन जाधव व रावसाहेब दानवे यांच्यातील संघर्ष याआधीही अनेकदा पाहायला मिळाला आहे. अनेकदा हर्षवर्धन जाधव यांनी दानवे यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे निवेदन घेण्यास केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी नकार दिला. हा सगळा प्रकार रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्नड दौर्यात घडला आहे.
जाधव यांनी देवगाव पोलिस स्टेशन येथे लेखी विनंती केली. यावर पोलिसांनी त्यांना सांगितले तुम्ही निवेदन देऊ नका. कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचेल, असे कारण देत पोलिसांनीही त्यांना निवेदन न देण्यास सांगितले. देवगाव पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना याबाबत सांगण्यात आले.
Post a Comment